रत्नागिरी-सुधारित

रत्नागिरी-सुधारित

-rat९p२९.jpg-KOP२३L८१६१९
रत्नागिरी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचे ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री उदय सामंत.

महाआरोग्य मेळावा सर्वसामान्यांसाठी लाभदायक

पालकमंत्री उदय सामंत ; ८४५ जणांची झाली नोंदणी
रत्नागिरी, ता. ९ ः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस हा राज्यात आरोग्यदिन म्हणून साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून रत्नागिरीमध्ये गुरूवारी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना होणार असून सर्वसामान्यांचा आजारपणामुळे होणारा आर्थिक भार हलका करण्याच्यादृष्टीने महाआरोग्य मेळावा महत्वाचा ठरणार आहे. आपल्या सर्वांचेच आरोग्य उत्तम राहो हीच इश्वरचरणी प्रार्थना, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
महाआरोग्य मेळाव्याचा प्रारंभ पालकमंत्री उदय सामंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले त्या वेळी ते बोलत होते. ''हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'' असे राज्यात ५०० मोफत दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून जनतेला मोफत आरोग्यसुविधा मिळणार आहेत. पालकमंत्र्यांनी उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले, ‘अत्यंत कमी कालावधीमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय व प्रशासनाने हा मेळावा उत्तम पद्धतीने आयोजित केला आहे.’
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शिबिर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी पालकमंत्री उदय सामंत महाआरोग्य मेळाव्याला हजर झाले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. महाआरोग्य मेळाव्यामधील उपचार करणारे डॉक्टर्स व उपस्थित नागरिक यांच्याशी संवाद साधला. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.


चौकट-१
हृदयविकार झटक्याच्या प्रमाणात वाढ
४० लहान मुलांवर हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. सर्वांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे; परंतु ४० ते ४५ वयोगटाताली व्यक्तींना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा विचार आणि मार्गदर्शन आरोग्य विभागाने करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मंत्री सामंत यानी केले.


ौकट २

देहदानाचे १० संकल्प
आरोग्य शिबिरामध्ये दिवसभर अनेकांनी लाभ घेतला. मरणोत्तर देहदान संकल्पाचे १० अर्ज आले. ९ जण फॉर्म घेऊन गेले. मरणोत्तर नेत्रदान ३१ जणांनी करण्याचा संकल्प घेतला. अवयवदान-नेत्रदान १० जणांनी करण्याचा संकल्प घेतला. नेत्रतपासणी २३६, मोतीबिंदू ५५, चष्मे ११० इतर ७१ तर शिबिरातील २२ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. २८ जणांनी रक्तदान केले. शिबिरासाठी एकूण नोंदणी ८४५ एवढी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com