शीळ धरणातील पाणी 5 जुलैपर्यंत पुरेल

शीळ धरणातील पाणी 5 जुलैपर्यंत पुरेल

Published on

५ (टुडे पान ३ साठी)

शीळ धरणातील पाणी ५ जुलैपर्यंत पुरेल

पालिका प्रशासन ; नागरिकांना दिलासा

रत्नागिरी, ता. १८ ः शहराला ५ जुलैपर्यंत पुरेल इतका शीळ धरणात जिवंत पाणीसाठा आहे. दहा दिवसांपूर्वी या धरणात ०.४४४ द.ल.घ.मी. पाणीसाठा होता. हा पाणीसाठा प्रतिदिन १० दशलक्ष लिटर प्रमाणे जून अखेरपर्यंत पुरणारा होता. गेल्या चार दिवसांत पडलेल्या हलक्या पावसामुळे ५० दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढल्याचे पालीका प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता पाणीसाठा ०.३४३ दशलक्ष घनमीटर इतका झाला असून तो ५ जुलैपर्यंत पुरेल.
यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. दरवर्षी मे महिन्यात रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या कपातीचा निर्णय घेतला जात होता. परंतु अल्निनोच्या संकटामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यावरच शहराचा पाणी पुरवठा एकदिवसाआड करण्यात आला. या नियोजनामुळे पाणी पुरवठ्यात दाब नसल्याने तक्रारी येऊ लागल्या. यावर उपाय म्हणून मुख्याधिकारी तुषार बाबर आणि पाणी विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी शहराचे खालचा आणि वरचा असे दोन भाग केले. सुरवातीला शहराच्या खालच्या भागाला पाणी पुरवण्यात आले. दुसऱ्‍या दिवशी खालच्या भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवून वरच्या भागाला पाणी देण्यात आले. हे नियोजन अद्याप सुरूच आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले तेव्हा १.८०० दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा होता. दरदिवशी १० दशलक्ष लिटरप्रमाणे जून अखेरपर्यंत हे पाणी पुरणारे होते. शीळ धरणात ६ जून रोजी ०.४४४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. तो पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरणारा होता. परंतु गेल्या चार दिवसात जो काही पाऊस पडला त्यातून धरणाच्या पाणीसाठ्यात मोठा फरक पडला नसला तरी सध्याच्या पाणी पुरवठ्याच्या नियोजनानुसार ५ जुलैपर्यंत हे पाणी पुरेल इतका साठा झाला आहे. गेल्या चार दिवसांत पडलेल्या पावसाने शीळ धरणात ५० दशलक्ष लिटरची भर पडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.