टोमॅटो पोहचला
दिडशेजवळ

टोमॅटो पोहचला दिडशेजवळ

Published on

21972

टोमॅटो पोहचला
दिडशेजवळ
सावंतवाडी, ता. १० ः दिवसेंदिवस भाज्यांचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांना घाम फुटला आहे. टोमॅटोचे दर १२० ते १५० रुपये किलोवर आले असताना भाज्यांचेही भाव गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस भाज्यांचे वाढत असल्याने सर्वसामान्य माणसाला महागाईची झळ सोसावी लागत आहे.
मिरची, कोथिंबीर याचेही दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे नागरिक अस्वस्थ आहेत. सध्या सर्वच भाज्यांचे दर कमालीचे वाढले आहेत. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या मिरची, कोथिंबीर, टॉमेटो तसेच भाज्यांचे दर खूपच वाढले असल्याने सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. कोथिंबीर जुडी पन्नास ते साठ रुपयापर्यंत पोचली आहे. मिरची दर शंभरपेक्षा अधिक झाला आहे. गावठी भाज्यांची बाजारात आवक होण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. श्रावण लागण्यापूर्वी भाज्यांचे दर वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.