रत्नागिरी ः कांदळवन संरक्षणासाठी टोल फ्री क्रंमाक

रत्नागिरी ः कांदळवन संरक्षणासाठी टोल फ्री क्रंमाक

Published on

कांदळवन संरक्षणासाठी टोल फ्री क्रंमाक
रत्नागिरी, ता. १० ः कांदळवन संरक्षणाच्यादृष्टीने जिल्हा प्रशासाने पुढचे पाऊल उचलले आहे. कंदळवनाची राजरोस तोड रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. १८००-२३३-२६८७ असा हा नंबर असून तक्रार असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तक्रारी स्वीकारणे व तक्रारीचे निवारण होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर बैठक झाली. यामध्ये टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना नुकत्याच विभागस्तरावरून देण्यात आल्या होत्या. कांदळवनाच्या ऱ्हासाबाबत व तोडीबाबत जिल्हास्तरावर तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा टोल फ्री नंबर १८००-२३३-२६८७ उपलब्ध करून दिला आहे. कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या जर काही तक्रारी असतील तर त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.