-काजू लागवड केली, संरक्षणाकडे दुर्लक्ष

-काजू लागवड केली, संरक्षणाकडे दुर्लक्ष

Published on

३३ (पान ५ साठी)


-rat२५p२६.jpg-
२३M१८८०८
पावस ः मावळंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या बाजूने लावलेल्या काजू रोपांना कोणतेही संरक्षण दिलेले नाही.
------------

काजू रोपांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष

वनविभागाकडून मावळंगेत वृक्षारोपण ; किती झाडे जगणार हा प्रश्न

पावस, ता. २६ ः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रत्नागिरी वनविभागाने रस्त्याच्या बाजूने काजू रोपांची लागवड केली आहे. मात्र रस्त्याच्या बाजूने लावण्यात आलेली रोपांच्या संवर्धनाबाबत कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जातात. मात्र त्यांच्या संवर्धनाबाबत काळजी घेतली जात नसल्याचे पुढे येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राज्य मार्गावरील रस्त्याच्या बाजूला वन विभागाने काजूची रोपे लावली आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवतामध्ये रोपांची लागवड करण्यात आली आहे. मात्र त्या रोपांच्या बाजूला संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे यातील किती झाडे जगणार असा प्रश्न पुढे येत आहे.
या संदर्भात ग्रामस्थ अनिल बिरजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वनविभागाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या चला झाडे लावू या कार्यक्रमांतर्गत काजूची रोपे रस्त्याच्या बाजूने लावली आहे. ही झाडे लावून त्याने शासनाला आम्ही झाडे लावली आहेत हे दाखवून दिले आहे. मात्र ती जगवायची कुणी आणि कशी यावर उपाययोजना केलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.