मद्यपींकडून धबधबा परिसर करून घेतला स्वच्छ

मद्यपींकडून धबधबा परिसर करून घेतला स्वच्छ

Published on

rat26p38.jpg
19025
राजापूरः चुनाकोळवण येथील सवतकडा धबधबा.

rat26p39.jpg
19026
चुनाकोळवण ग्रामपंचायतीने पर्यटकांना मार्गदर्शक आणि मनाई संबंधित सूचना देणारे लावलेले फलक.


मद्यपींकडून धबधबा परिसर करून घेतला स्वच्छ
सवतकडा येथे जागरूक ग्रामस्थांसह अंबिकेश्‍वर प्रतिष्ठानने शिकवला धडा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ः तालुक्यातील चुनाकळवण येथील सवतकडा धबधबा गेल्या काही वर्षामध्ये पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या ठिकाणी बिनधास्तपणे मद्यपान करत वातावरण बिघडवणाऱ्या पर्यटकांना गावातील चुनाकोळवण अंबिकेश्‍वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि जागरूक ग्रामस्थांनी चांगलाच धडा दिला आहे. वातावरण बिघडवणाऱ्या परजिल्ह्यातील मद्यपींना सज्जड दम देताना संबंधितांकडून त्या परिसराची स्वच्छताही करून घेतली.
मुंबई-गोवा महामार्गावरून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधबा गेल्या काही वर्षामध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. या धबधब्याच्या ठिकाणी स्थानिक लोकांसह पुणे, कोल्हापूर, मुंबई, सांगली आदी परिसरातीलही हौशी पर्यटक मोठ्या संख्येने येऊन निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटत आहेत. पर्यटकांच्या संख्येमध्ये दरवर्षी अधिकच वाढ होत चालली आहे; मात्र, निसर्ग परिसर आणि लोकवस्तीपासून काहीशा दूर असलेल्या या धबधब्याच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून त्या ठिकाणी बिनदिक्कतपणे मद्यपान केले जात असल्याचे चित्रही दिसत आहे. त्याचा त्रास त्या ठिकाणी कुटुंबीयांसमवेत आलेल्या महिला, तरुणी, लहान मुलांना होतो. त्याच्यातून त्या ठिकाणचे वातावरणही बिघडते. काही दिवसांपासून धबधबा परिसरामध्ये मद्यपान करून वातावरण बिघडवणाऱ्या पर्यटकांना चुनाकोळवण येथील श्री अंबिकेश्‍वर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच धडा दिला. गावातील काही जागरूक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्यासह गावप्रमुख मधुकर मठकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुभाष गुरव, अनिल गुरव, गणेश गुरव, प्रदीप भेरे आदींनी वातावरण बिघडवणाऱ्या मद्यपींना दम देताना संबंधितांकडून त्या परिसराची स्वच्छताही करून घेतली. भविष्यामध्ये अशाप्रकारे वातावरण बिघडवणार्‍यांना चांगलाच धडा देण्याचा इशाराही या वेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दिला. दरम्यान, उत्साही आणि मद्यपी पर्यटकांना प्रतिबंध करण्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याचे निवेदन प्रतिष्ठानच्यावतीने स्थानिक ग्रामपंचायतीसह प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना दिले आहे.

चौकट
ग्रामपंचायतीकडून माहितीचे फलक
कोकणात तीव्र उताराचा भाग असल्याने पाऊस पडल्यानंतर काही मिनिटांमध्ये पाणी वाहत येते. याबाबत स्थानिक लोकांना माहिती असते. अन्य भागातून येणार्‍या पर्यटकांना फारशी माहिती नसते. चार वर्षापूर्वी मुसळधार पावसामध्ये अचानक वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी आलेले पर्यटक वाहून जातात. सुदैवाने आतापर्यंत जीवितहाना झालेली नाही. त्यामुळे सवतकडा धबधब्याच्या येथील भौगोलिक स्थितीसह पर्यटनस्थळाची माहिती आणि सुरक्षेच्यादृष्टीने योग्य ती माहिती सूचना देणारे फलक ग्रामपंचायतीने लावले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.