किसान

किसान

२७ (पान ५ साठी)

‘किसान सन्मान’ शेतकऱ्यांची नवसंजीवनी

कुलगुरू डॉ. संजय भावे ; गावोगावी ग्राम समृद्धी केंद्र हवे

दाभोळ, ता. ३१ ः भारतातील ६० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. कोकण हा जैवविविधतेने नटलेला प्रदेश आहे. प्रधानमंत्री यांनी खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली किसान सन्मान निधी या योजनेमुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आाहे. पंतप्रधानांनी उचलेलं हे पाऊल भारताला प्रगतीकडे नेणार आहे, असे प्रतिपादन विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. भावे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजस्थान येथील सिकर येथे आयोजित प्रधानमंत्री किसान सन्माननिधी संमेलनामध्ये प्रधानमंत्री किसान निधीचा १४ वा हप्ता देशातील ८.५ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. हा कार्यक्रम दूरदृश्यप्रणालीद्वारे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागाच्या सभागृहात झाला. त्यावेळी डॉ. भावे बोलत होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी शेतकऱ्यांना ही योजना नवसंजीवनी देणारी आहे. गावोगावी ग्राम समृद्धी केंद्राची स्थापना झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. दापोली येथे दोन ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये विद्यापिठाच्या विस्तार शिक्षण विभागाच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमासाठी ७१ शेतकरी उपस्थित होते. या वेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com