भाट्ये समुद्रात विसावली ८४ कासवांची पिल्ले

भाट्ये समुद्रात विसावली ८४ कासवांची पिल्ले

पान ५

भाट्ये समुद्रात विसावली
८४ कासवांची पिल्ले
पावस, ता. ४ ः रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी संवर्धन केलेल्या कासवांच्या घरट्यातील ८४ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात भाट्ये समुद्रकिनारी कासवाची अंडी सापडली होती. कासवमित्र समीर भाटकर, भाट्ये उपसरपंच राजेश पाटील, जितेंद्र शिंदे, उद्योजक माजी सरपंच पराग भाटकर, झरी विनायक मित्रमंडळाचे पप्या भाटकर, भूषण भाटकर आदींनी ही पिल्ले समुद्रात सोडली.
झरी विनायक मंदिराचे पुजारी व कासवमित्र समीर भाटकर यांच्या निदर्शनास एक कासव अंडी घालत असताना लक्षात आल्यावर त्यांनी भाट्ये सरपंच प्रीती भाटकर, उपसरपंच राजेश पाटील आणि ग्रामस्थांना याची कल्पना दिली. या लोकांनी तत्काळ झरी विनायक मंदिराचे येथे येऊन प्राणीमित्रांना बोलावून १४१ अंड्यांचे संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com