शिक्षक भरती

शिक्षक भरती

शिक्षक भरती प्रक्रिया
लवकरच सुरू होणार
अमोल कांबळे : सत्‍यशोधकच्या लढ्याला यश
कणकवली, ता. २५ : आचारसंहितेमुळे ब्रेक लागलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू होईल. सत्यशोधक शिक्षक सभा या संस्थेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकर सुरू होत असल्‍याची माहिती सत्‍यशोधक शिक्षक सभा सिंधुदुर्ग अध्यक्ष अमोल कांबळे यांनी आज दिली.
श्री. कांबळे म्‍हणाले, ‘‘राज्‍यात पवित्र पोर्टलद्वारे २१ हजार ६७८ जागांपैकी ११ हजार ८५ उमेदवारांची शासनाने नियुक्‍ती केली होती. मात्र, शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया तसेच आचारसंहिता सुरू झाल्‍याने शिक्षक भरती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन शिक्षक भरतीची उर्वरित प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी सत्यशोधक शिक्षक संघटनेने सातत्‍याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्‍यानुसार १९ एप्रिलच्या शासन पत्राद्वारे नियम, अटी यांना अधीन राहून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्‍यानुसार लोकसभा मतदारसंघात जेथे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तेथे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तत्‍पूर्वी, सध्याच्या शिक्षकांच्या बदल्‍या आणि समायोजन होईल. त्‍यानंतर शिक्षकपदे रिक्‍त असलेल्‍या शाळांमध्ये निवड झालेल्‍या उमेदवारांना नियुक्‍तीपत्र देण्याचा मार्ग मोकळा होईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com