महामानवाच्या विचारांना आचरणात आणा

महामानवाच्या विचारांना आचरणात आणा

२५ (टूडे पान ३ साठी)

rat३०p१८.jpg-
२४M८०६८५
रत्नागिरी : आदिनाथ सोसायटीत आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. प्रकाश नाईक. सोबत संजय मारळकर व पदाधिकारी.

महामानवाच्या विचारांना आचरणात आणा

प्रा. प्रकाश नाईक ः टीआरपी येथे जयंती कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : महामानवांना एका जातीत बंदिस्त करणे म्हणजे त्यांच्या विचारांशी केलेली प्रतारणा असते. सर्व महामानवांनी समग्र मानवमुक्तीचा विचार दिला आहे. याच विचारांचा वारसा अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन साहित्य अभ्यासक प्रा. प्रकाश नाईक यांनी केले.
शहरातील टीआरपी येथील आदिनाथ सोसायटीत महामानवांचा संयुक्त जयंती समारंभ आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थान संजय मारळकर यांनी भूषवले. प्रा. नाईक म्हणाले, छत्रपती शिवरायांनी समतेवर आधारलेले स्वराज्य निर्माण केले तर महात्मा फुले व शाहू महाराजांनी समतेचा विचार अधिक बुलंद केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या विचारांच्या आधारेच भारतीय संविधान निर्माण केले. कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा यांनी हा विचारप्रवाह अधिक गतिमान केला. सर्वच महामानवांचा खरा इतिहास समजून घेत आपण भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश चवेकर यांनी केले. या वेळी संजय कदम, तुषार जाधव, सिद्धार्थ सावंत, प्रा. सुकुमार शिंदे, सतीश कदम आदींसह ज्येष्ठ नागरिक, तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com