एकजुटीने काम करा, राणेंचा विजय निश्चित

एकजुटीने काम करा, राणेंचा विजय निश्चित

३९ (पान ५ साठी)


-rat३०p२६.jpg-
२४M८०७६७
रत्नागिरी- तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत.
-----------

राणेंसाठी एकजुटीने काम करा

उदय सामंत ः रत्नागिरीत विकास गंगा आणू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : रत्नागिरीचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व मंत्री नारायण राणे यांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी करायचे आहेच. केंद्रात त्यांना मंत्रिपदही मिळेल. त्यांच्याकडून हक्काने रत्नागिरीच्या विकासाची कामे करून घ्यायची आहेत. त्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करा. त्यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते राज्याचे उद्योगमंत्री यांच्या मतदार संघातील वाटद जिल्हा परिषद गटात महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरीत विकासकामे सुरूच आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना घरोघरी फिरून प्रचार करण्याच्या सूचनाही सामंत यांनी दिल्या. कॉर्नरसभेपेक्षा वाटद जिल्हा परिषद गटाच्या मेळाव्याला दुप्पट गर्दी, असा टोलाही सामंतांनी उबाठा गटाला लगावला. या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, कांचन नागवेकर, विवेक सुर्वे, प्रकाश साळवी, गजानन पाटील, बाबूशेठ पाटील, योगेंद्र कल्याणकर, तारक मयेकर, अनिकेत सुर्वे, अझीम चिकटे, बापू सुर्वे, भाई जाधव यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com