रोजगार, आरोग्य प्रश्नांबाबत जनता त्रस्त

रोजगार, आरोग्य प्रश्नांबाबत जनता त्रस्त

swt28.jpg
81032
सावंतवाडीः येथे पत्रकार परिषदेवेळी उपस्थित काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, विभावरी सुकी व मान्यवर.

रोजगार, आरोग्य प्रश्नांबाबत जनता त्रस्त
इर्शाद शेखः राणेंनी जनतेला काय दिले ?
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः सिंधुदुर्गातील जनतेने ३० ते ३५ वर्ष एक हाती नारायण राणे यांना नेतृत्व करण्याची संधी दिली. ‘तुम्ही सांगाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण’ असे जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिले आणि त्यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेते अशी सत्तापदे भोगली. पण, या बदल्यात त्यांनी जनतेला काय दिले ? असा प्रश्न काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी उपस्थित केला. रोजगार, आरोग्य या बाबतीत जनता त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना पाठिंबा दिला असून त्यांच्या प्रचारात आघाडी घेतली असल्याचे श्री. शेख व जिल्हा उपाध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
श्री. शेख म्हणाले, ‘‘तीस-पस्तीस वर्षात आरोग्य, रोजगार अशा कोणत्याही प्रश्नावर ते लोकांना न्याय देऊ शकले नाहीत. आज रोजगारासाठी गोव्यात जावे लागत आहे तर आरोग्य उपचार करणारी यंत्रणाही नाही. मात्र, विनायक राऊत यांनी खासदार असूनही योग्य प्रकारे काम केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील आणले आहे. त्यांना संसदपटू हा सन्मानही मिळाला आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात पाच न्याय योजना दिल्या असून त्यावर पंतप्रधान चुकीच्या पद्धतीने टीका करत आहेत. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या योगदानाची अंमलबजावणी केली आहे. पंतप्रधान जनतेची दिशाभूल करत आहेत.’’
अॅड. नार्वेकर म्हणाले, ‘‘लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी देशभरामध्ये भाजपच्या विरोधात वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना यापूर्वी कधी आवाहन केल्याचे ऐकिवात नाही. प्रथमच निर्भय वातावरणात मतदान करण्याचे आव्हान केलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे जनतेने ओळखले पाहिजे. इलेक्ट्रॉल बाँडबाबत पैसे गोळा करणे म्हणजे खंडणीचा प्रकार असल्याचे अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब केले आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘नारायण राणे आणि दीपक केसरकर दोघे कॅबिनेट मंत्री असूनही त्यांनी एकही कारखाना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणला नाही. सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत केसरकर लोकांची दिशाभूल करत आहेत. मल्टीस्पेशालिटी मी चार ते पाच एकर जागा सावंतवाडी द्यायला तयार आहे, त्यांनी ती जागा घ्यावी आणि मल्टीस्पेशालिटी सुरू करावे.’’
जिल्हा युवक अध्यक्ष किरण टेंबुलकर, सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, विभावरी सुकी, माया चिटणीस, अॅड. संभाजी सावंत, अॅड. राघवेंद्र नार्वेकर, सुमेधा सावंत, संदीप सुकी, श्री. नंदीहल्ली, कौस्तुभ पेडणेकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com