सेवा रस्त्याचे काम प्रथम 
पूर्ण करणे आवश्यक

सेवा रस्त्याचे काम प्रथम पूर्ण करणे आवश्यक

83259
बांदा ः येथे ठेकेदाराशी चर्चा करताना जावेद खतीब व बाळु सावंत.


सेवा रस्त्याचे काम प्रथम
पूर्ण करणे आवश्यक

बांद्यात ठेकेदार कंपनीला सूचना

बांदा, ता.१२ ः मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीबाबत उपसरपंच बाळू सावंत व माजी उपसरपंच जावेद खतीब यांच्यासह शिष्टमंडळाने ठेकेदाराशी चर्चा केली. यावेळी पुलाचे काम थांबवून प्रथम प्राधान्याने सेवा रस्त्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना यावेळी ठेकेदार कंपनीला दिले. तसेच दाणोलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील गटार तात्काळ पूर्ण करा. जेणेकरून या दिशेने जाणारी वाहतूक मोकळी होईल. तसेच जलजीवनच्या ठेकेदाराला जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करा, जेणेकरून सेवा रस्ता तयार करताना कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्या, अश्या सूचना शिष्टमंडळाने दिल्या.
महामार्गावरील बांदा येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यातच सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू असल्याने गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे त्यामुळे सकाळच्या आणि संध्याकाळच्या सत्रात मोठी वाहतूक कोंडी होती. त्या पाश्वभूमीवर बांदा उपसरपंच बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य श्याम मांजरेकर आदींसह ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, जलजीवनचे काम करणारे ठेकेदार उपस्थित होते. यावेळी बांदा येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत चर्चा करण्यात आली. यावर ठेकेदाराने सध्या सेवा रस्त्याचे काम सुरू असून आम्ही युद्धपातळीवर काम करतो मात्र महामार्गावर एवढी वाहतूक आहे त्यातच दोडामार्गला जाणारी येणारी, दाणोलीमार्गे जाणारी येणारी वाहतूक व महामार्गावरील वाहतूक असल्याने वाहतूक कोंडी होते. यावर जावेद खतीब यांनी तुम्ही बॅरिगेड लावून वाहतूक एकमार्गी वळवा, असे सांगितले. तसेच जमेल तेवढ्या जलदरित्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण करा असे सांगत वाहतूक कोंडीचा त्रास कसा कमी होईल याकडे लक्ष द्या तसेच यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस प्रशासनाची मदत घ्या अशा सूचना दिल्या.
यावेळी बाळू सावंत यांनी महामार्गावरील दाणोली मार्गावर असलेले गटार पूर्ण करा असे सांगितले. यावर आम्ही नळपाणी योजनेचा पाईप असल्याने तो पूर्ण करेपर्यंत हे काम करू शकत नाही असे सांगितले. यावर बाळू सावंत यांनी तात्काळ जलजीवनचे काम करणाऱ्या ठेकेदाराला आणि नळकामगाराला बोलावून हे काम आजच्या आज पूर्ण करा अश्या सूचना दिला. आज सायंकाळपर्यंत जलवाहिनीचे काम पूर्ण करा आणि ते पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे गटार पूर्ण करा जेणेकरून येत्या पाच ते सहा दिवसात दाणोली मार्गावर जाणारी वाहतूक यामार्गे वळवून होणारी वाहतूक कोंडी कमी करता येईल असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com