रत्नागिरी-जिल्ह्यातील 43 हजार 960 नागरिकांना टँकरचा आधार

रत्नागिरी-जिल्ह्यातील 43 हजार 960 नागरिकांना टँकरचा आधार

83429

जिल्ह्यातील १५८ वाड्यांत टँकरने पाणी
शहरी भागातही तीव्र टंचाई; रत्नागिरी, चिपळूण तालुक्याला सर्वाधिक झळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः दरवर्षीप्रमाणे मेच्या मध्यात रत्नागिरी जिल्ह्यातील टँकरग्रस्त वाड्यांची संख्या १५८ वर पोचली आहे. ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून याचा लाभ ४३ हजार ९६० लोकांनी घेतला आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, राजापूर असा शहरी भागातही टंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे.
मागील आठवड्यात जिल्ह्यात ४३ गावातील १२४ वाड्यात टँकरने पाणी दिले जात होते. आठ दिवसांनी त्यात मोठी भर पडली आहे. ६१ गावातील १५८ वाड्यांना टँकरची गरज भासू लागली आहे. १८ गावातील ३४ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. टेरव आणि सावर्डे या दोन गाव परिसरात अनुक्रमे ३ हजार आणि ४ हजार लोकांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे. खेड, रत्नागिरी, चिपळूणसह अन्य तालुक्यात काही गावांनी टँकरची मागणी केली आहे; पण त्यांना प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे टँकरग्रस्तांच्या यादीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक टंचाईची झळ रत्नागिरी, चिपळूण या दोन तालुक्यात आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडे स्वतःचे टँकर नसल्यामुळे खासगी टँकर भाड्याने घेतले जात आहेत. दरम्यान, रत्नागिरी नगरपालिकेने सोमवारपासून (ता. १३) एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.

चौकट
जिल्ह्यातील टंचाईची स्थिती
*तालुका*गाव*वाड्या
*मंडणगड*१*१
*दापोली*२*२
*खेड*८*२६
*चिपळूण*१६*३५
*संगमेश्‍वर*६*११
*रत्नागिरी*७*४४
*लांजा*३*५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com