पालीत विंधण विहीरींच्या संख्येत वाढ

पालीत विंधण विहीरींच्या संख्येत वाढ

६ (टुडे पान १ साठी)

पालीत विंधन विहिरींच्या संख्येत वाढ
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १५ ः तालुक्यातील पाली या गावाला बारमाही वाहणारी नदी, धरण, जलाशय नाही. त्यामुळे पाणीस्त्रोतांचा आधार विहिरींना नाही. दिवसेंदिवस कमी होणारे पावसाचे प्रमाण आणि वाढती लोकसंख्या यामुळे विहिरी कोरड्या पडत आहेत. अनेकांनी विंधन विहिरी खोदण्यावर जोर दिला आहे.
पालीतील बाजारपेठपरिसरात नवीन वसाहतींच्या परिसरात पिण्यासाठी पाणी कमी आहे. कोल्हापूर मार्गाचे चौपदरीकरण चालू असल्याने पाली बाजारपेठ परिसरात उंचवटा झाला आहे. तसेच मुंबई–गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे महामार्गांलगत असणारी भूमिगत जलवाहिनी फुटत असून ग्रामपंचायतीच्या योजनेचे पाणी येण्यास अडथळा होतो. कडक उन्हामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीच्या जलस्त्रोतांवर परिणाम झाला आहे. पाणी पूर्ण आटल्याने या परिसराचा पाणीपुरवठा पूर्ण बंद झाला आहे. शिवाय खासगी वितरकांकडे पाणी वेळेत मिळत नसल्याने ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून अनेकांनी साडेचार ते सहा इंची रुंदीच्या उपलब्धतेनुसार विंधन विहिरी खोदलेल्या आहेत. त्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे. त्यामुळे खोल जलस्त्रोतांवर परिणाम होऊन ते कमी होण्याचा धोका भविष्यात निर्माण झाला आहे. या परिसरामध्ये ओढ्यावर बंधारा किंवा अन्य पाणी जिरविण्यासाठी योजना राबविलेली नाही. परिणामी जलस्त्रोत कमी होऊन पाणीटंचाईची तीव्रता अधिक भासणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com