रत्नागिरी-उक्षीत तीन वाहने अज्ञाताने पेटवली

रत्नागिरी-उक्षीत तीन वाहने अज्ञाताने पेटवली

-rat15p23.jpg-
83857
रत्नागिरी ः उक्षी येथे अज्ञाताने पेटवलेले वाहन.

उक्षीत तीन वाहने पेटवली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : वाहने जाळण्याचे पुण्यातील लोण थेट रत्नागिरीतील ग्रामीण भागात पोहोचले आहे. तालुक्यातील उक्षी सावंत-गुरववाडी येथे अज्ञाताने मंगळवारी (ता. १४) मध्यरात्री ३ वाहने पेटवून दिली. ही वाहने जळून खाक झाली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उक्षी येथील शिवम केळकर यांनी याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री घरापासून काही अंतरावर त्यांच्या जागेतच त्यांच्या व नातेवाइकांच्या दोन दुचाकी, एक क्वालिस कार उभी करून ठेवण्यात आली होती. अज्ञाताने तिन्ही वाहने पेटवून दिली. त्यामध्ये दोन्ही दुचाकी पूर्ण जळून खाक झाल्या, तर मोटार अर्धवट जळालेल्या स्थितीत आहे. हे कृत्य करणाऱ्या माथेफिरूचा ग्रामीण पोलिस तपास करत आहेत. याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार विनायक राजवैद्य करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com