राजापूर-दांडे-अणसुरे पुलाचे काम संथगतीने

राजापूर-दांडे-अणसुरे पुलाचे काम संथगतीने

-rat23p38.jpg
85432
राजापूर : दांडे-अणसुरे पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे.

दांडे-अणसुरे पुलाचे काम संथगतीने

मनसेचा आंदोलनाचा इशारा; सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

राजापूर, ता. २३ ः तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलाच्या दुरुस्तीचे काम वर्षभर अत्यंत संथगतीने सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात काम पूर्ण होईल, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते; मात्र आता मे महिना संपत आला तरी पूल पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पंधरा दिवसांत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनेसेने दिला आहे.
याबाबतचे निवेदन मनसेचे तालुकाप्रमुख पंकज पंगेरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पूल बांधल्यापासून सुमारे पाच वर्षांतच नादुरुस्त झाला होता. दांडे-अणसुरे बाजूकडील पुलाचा काही भाग खचल्यामुळे तो धोकादायक झाला होता. त्यामुळे गतवर्षी मार्च महिन्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मूळ पुलाच्या जागी असलेला भराव हटवून एक पिलर वाढवून पुलाची लांबी वाढविली आहे. यासाठी अपेक्षित कालावधी तीन महिन्यांचा असताना आता वर्षभराचा कालावधी लोटला तरी पूल वाहतुकीसाठी सुरू न झाल्याने दोन्ही जिल्ह्यांतील वाहनचालक व जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पूल दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डोंगरतिठामार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com