जून ते सप्टेंबर कालावधीत
किनारपट्टीला उधाणाची भरती

जून ते सप्टेंबर कालावधीत किनारपट्टीला उधाणाची भरती

जून ते सप्टेंबर कालावधीत
किनारपट्टीला उधाणाची भरती

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात समुद्राला उधाण येणार आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत विजयदुर्ग, देवगड आणि मालवण बंदरात उधाण येणार आहे. यामध्ये विजयदुर्ग आणि देवगड बंदरात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत, तर मालवण बंदरात जून आणि जुलै महिन्यांत भरती येणार आहे.
पावसाळी हंगामास सुरुवात होणार असून, राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील मोडत असलेल्या नद्या, खाड्यांमध्ये अतिवृष्टी होऊन तेथे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापन, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नदी, खाड्यांमधील विविध स्थानांची जून ते सप्टेंबर या पावसाळी कालावधीमध्ये येणाऱ्या केवळ उधाणांच्या भरतीची माहिती अशी ः विजयदुर्ग बंदरावर जूनमध्ये ६, ७, ८, २३, २४, २५, जुलैमध्ये ६, ७, ८, २२, २३, २४, ऑगस्टमध्ये ५, ६, ७, २०, २१, २२, सप्टेंबरमध्ये १, २, ३, १८, १९ तारखांना उधाण येणार आहे. देवगड बंदरावर जूनमध्ये ६, ७, ८, २३, २४, २५, जुलैमध्ये ५, ६, ७, २२, २३, २४, ऑगस्टमध्ये ४, ५, ६, २०, २१, २२, सप्टेंबरमध्ये २, ३, ४, १९, २०, मालवण बंदरावर जूनमध्ये ७, ८, ९, २३, २४, २५, जुलैमध्ये ६ व ७ तारखेला उधाण येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com