पावस-टुडे पान १ साठी, संक्षिप्त पट्टा

पावस-टुडे पान १ साठी, संक्षिप्त पट्टा

बोगस बियाणे, खत
विक्री केल्यास कारवाई
पावसः खरीप हंगामात जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी बोगस बियाणे, खताची विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. बियाणे, खताची बोगस विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करत परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागातर्फे एका भरारी पथकाची स्थापना केली आहे. या पथकाचा प्रत्येक केंद्रावर वॉच राहणार आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. या काळात बोगस खते, बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाला सुरवात झाल्याने खरीप क्षेत्रात प्राथमिक टप्प्यातील कामे सुरू झाली आहे. खरिपासाठी जमिनीची नांगरणी, भाताच्या रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पेरणीची प्राथमिक तयारी करण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. आता फक्त पावसाची प्रतीक्षा असून, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून आहेत. खरीप हंगामाच्या प्राथमिक टप्प्यात शेतकरी खताची जुळवाजुळव करू लागला आहे. नियमित पाऊस येण्याआधी खताची सुरक्षितरित्या साठवणूक करण्यात येत आहे. यासाठी खत विक्री केंद्रावर मागणी नोंदविण्यात येत आहे.
........
अद्ययावत रामभद्रा
गस्ता नौका शोभेची
रत्नागिरीः जिल्ह्याच्या समुद्र क्षेत्रातील अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यासाठी आलेली अद्ययावत रामभद्रा गस्ती नौका कारवाईबाबत अपयशी ठरली. या नौकेच्या मदतीने सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाला एकही कारवाई करता आली नाही. मच्छीमार नौकांच्या उंचीपेक्षा या गस्ती नौकेची उंची कमी असल्याने मासेमारी नौकेत चढून तपासणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रतिदिन ९० हजार रुपये भाडे असलेली ही गस्ती नौका केवळ शोभेची ठरली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र क्षेत्रात अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाने अद्ययावत गस्ती नौका दिली. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे गस्ती पथक या नौकेतून समुद्रात कारवाईसाठी फिरत होते. परंतु रामभद्रा गस्ती नौका फायबरची असल्याने ती लाटांच्या माऱ्याने हेलकावे खाते. त्याचवेळी या गस्ती नौकेचा आकार आणि उंची मच्छीमार नौकांपेक्षा फारच कमी असल्याने गस्ती नौकेतून मच्छीमार नौकेत जाणे धोकादायक होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात आलेल्या या नौकेच्या मदतीने एकही कारवाई करता आली नाही. रामभद्रा गस्ती नौका महिन्यातून २४ दिवस समुद्रात फिरणे बंधनकारक होते. परंतु अनेक बिघाडामुळे ही नौका बंद ठेवावी लागत होती. करारातील तरतुदीनुसार दुसऱ्या पर्यायी गस्ती नौकेचीही उपलब्धता करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही गस्ती नौका कारवाईच्या बाबतीत कुचकामी ठरली.
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com