230 गंजलेले खांब, 45 रोहित्र पेट्या बदलल्या

230 गंजलेले खांब, 45 रोहित्र पेट्या बदलल्या

गंजलेले खांबांची
पावसाळयापूर्वी दुरुस्ती

रत्नागिरी, ता. ०३ : पावसाळयात वीजपुरवठ्यात कमीत कमी बिघाड होईल, ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा व्हावा यासाठी पावसापूर्वीची दुरुस्ती करण्यात आली. लघु व उच्चदाब वीजवाहिन्यांच्या ५ हजार ४५० गाळ्यातील वीजतारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्या. २३० खराब व गंजलेले खांब, ५ किलोमीटर लांबीच्या जीर्ण वीजतारा बदलल्या. ९५० मीटरच्या नादुरुस्त सर्व्हिस वायर तर ४५ खराब रोहित्र पेट्या बदलल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली.
जिल्ह्यातील ३२३ लघु व उच्चदाब वीजवाहिन्या गाळ्यातील सैल वीजतारा ओढल्या. २६ ठिकाणी लघु व उच्चदाब वीजवाहिन्या गाळ्यांना गार्डींग बसविले. ४५ खराब रोहित्र पेट्या बदलल्या. महावितरणकडून प्राधान्यक्रमानुसार वीजवाहिन्यांची व वीज उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व सामुग्री आणि उपकरणांचा साठा कार्यालयात करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com