रत्नागिरी ः पाच महिन्यात ४८ जोडप्यांचा वाचवला संसार

रत्नागिरी ः पाच महिन्यात ४८ जोडप्यांचा वाचवला संसार

पाच महिन्यात ४८ जोडप्यांचा वाचवला संसार
महिला व बालकल्याण खाते; सखी वन स्टॉपच्या प्रयत्नांना यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ः कोकणात हुंड्यांची मागणी करण्याची प्रथा बंद झाली आहे. अलिकडे वस्तुरूपात किंवा अन्य कारणांनी मुलींच्या सासरच्या माणासंकडून तिच्या माहेरच्या मंडळींकडे मागण्या केल्या जातात; मात्र या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर मुलीला त्रास देण्याचा प्रयत्नही केला जातो. माहेरच्या मंडळींकडून मुलीचा संसार तुटू नये यासाठी पोलिसात तक्रार देण्याचे धाडस करत नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांना जोडप्याचे काम येथील महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या सखी वन स्टॉप सेंटर करत आहे. सेंटरच्या माध्यमातून गेल्या पाच महिन्यांच्या विविध प्रकारच्या ७१ तक्रारींपैकी या केंद्राने ४८ जोडप्यांमध्ये समेट घडवून आणला आहे.
कोकणातील बहुतांश लोक कायद्याच्या चौकटीला मानणारे आहेत. त्यामुळे अन्य जिल्ह्यांप्रमाणे कोकणात लग्नात हुंड्याची मागणी केली जात नाही; मात्र गाडी, घर, नवऱ्याच्या नोकरीसाठी पैशाची मागणी, परदेशात जाण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची मागणी केली जाते. ही मागणी मुलाच्या माहेरच्याकडून पूर्ण झाली नाही तर त्या मुलीला सासरचे त्रास देण्यास सुरवात करतात. अशावेळी मुलीचा संसार तुटू नये आणि मुलीचा छळही थांबावा यासाठी पोलिसात तक्रार देण्यासाठी माहेरचे जात नाहीत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी माहेरच्यांना दिव्य करावे लागते. महिला व बालविकास विभाग मान्यताप्राप्त सखी सेंटरने समुदेशन करून अनकांचे संसार जोडले आहेत. जानेवारी ते मे या पाच महिन्यात विविध प्रकारच्या ७१ तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यापैकी ४८ जोडप्यांमध्ये समेट घडवून आणला आहे. या सेंटरतर्फे पीडितेला सर्व सेवा मोफत पुरवणे हा सखी सेंटरचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे एकाच छताखाली विनामुल्य समुपदेशन, पोलिस सुविधा कायदेविषयक मार्गदर्शन, वैद्यकीय सुविधा, निवारा आदी सेवा पुरवल्या जातात तसेच कौटुंबिक हंसाचार, लैंगिक शोषण, सायबर क्राईम, बालविवाह, बलात्कार यावरही काम केले जाते. त्याचबरोबर सासरच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रारीही दाखल होतात. पोलिसात गुन्हा दाखल करण्यापेक्षा सखी सेंटर समेट घडवून दोघांचा तुटत असलेला संसार सावरण्यासाठी अनेक कुटुंबे येथे येत असतात.

चौकट...
समुपदेशनाने संसार जोडले जातात...
कोकणात हुंडा मागणी बंद असली तरी मात्र वेगवेगळ्या कारणांनी त्या स्त्रीच्या माहेरच्याकडून विविध वस्तू किंवा पैशाची मागणी केली जाते. संसार तुटू नये यासाठी सखी सेंटरकडे तक्रार घेऊन येतात. इथे समुपदेशनाने संसार जोडले जातात, असे सखी वन स्टॉप सेंटर रत्नागिरीच्या संचालिका अश्विनी मोरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com