धोकादायक झाडांचा सर्व्हे 
करून तातडीने तोडावीत

धोकादायक झाडांचा सर्व्हे करून तातडीने तोडावीत

89084

धोकादायक झाडांचा सर्व्हे
करून तातडीने तोडावीत

सावित्री पालेकर ः आंबोली घाटप्रश्‍नी मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः आंबोली घाटात कोसळणाऱ्या झाडांना वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. त्यामुळे धोकादायक झाडांचा सर्व्हे करून ती तोडावीत, अशी मागणी आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी केली आहे.
सौ. पालेकर यांच्या मते, दरवर्षी आंबोली घाटातील रस्त्यावर झाडे कोसळत असतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग कधीही एकत्रितरित्या धोकादायक झाडांबाबत सर्वे करून धोकादायक झाडे छाटणे किंवा कापणे यासाठी कार्यवाही करताना दिसत नाहीत. दरवर्षी झाडे रस्त्यावर पडल्यावर व रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यावरच कार्यवाही करतात. आंबोली ग्रामपंचायतीने गेल्या वर्षीही याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती संबंधित विभागांना केली होती. या वर्षीही केली आहे. मात्र, याबाबत ठोस कार्यवाही संबंधित विभागाकडून होताना दिसत नाही. सुदैवाने आतापर्यंत मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, जर एकदा मोठा अपघात घडलाच तर त्याला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग जबाबदार असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की, सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाने लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे व तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी सौ. पालेकर यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com