आरवली येथे रस्त्याचा भाग खचण्याची भिती

आरवली येथे रस्त्याचा भाग खचण्याची भिती

- rat११p१५.jpg
२४M८९३२२
ः संगमेश्वर ः आरवली उड्डाणपूल येथील मातीच्या ढिगामध्ये पोकळी निर्माण होत आहे.

आरवली येथे रस्त्याचा भाग खचण्याची भीती

पावसात भराव गेला वाहून; प्रशासनाकडून उपायोजनेची गरज

सकाळ वृत्तसेवा ः
संगमेश्वर, ता. ११ ः मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आरवली उड्डाणपुलाजवळ खेरशेतजवळ गोव्याच्या दिशेने डाव्या हाताला रस्त्याखालचा भराव पहिल्याच पावसात वाहून गेला. वाहून गेलेला भराव कळू नये म्हणून ठेकेदाराकडून मातीच्या भरावाचे ढीग आणून ओतण्यात आले. तरीही दोन ढिगांच्यामध्ये जागा मोकळीच राहिली आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
चिपळूण येथील बहादूरशेख नाक्यावर उड्डाणपुलाच्या बाबतीत घटना ताजी असताना आरवली येथील उड्डाणपुलांच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात असून, त्याची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. उड्डाणपुलांना काढलेल्या पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे ढीग येऊन पडलेले आहेत. त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. पाऊस तोंडावर आलेला असताना ज्या उपाययोजना तातडीने केल्या पाहिजेत त्या कोणत्याच ठेकेदाराकडून केल्या जात नाहीत, अशी स्थानिकांची नाराजी आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे सुरू असलेल्या कामाबाबत गांभीर्य नसल्याचे वारंवार पुढे येत आहे. महामार्गावर साचणारे पाणी व चिखल, सर्व्हिस रोडवरील खड्डे, लांजा वाकेड परिसरात खचणारा भाग, आरवली उड्डाणपुलासारखे धोकादायक पूल यामुळे मुंबई-गोवा महामार्ग धाकादायक बनू पाहत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com