रत्नागिरी - जयगड रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थ आक्रमक

रत्नागिरी - जयगड रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थ आक्रमक

Published on

94274

जयगड रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थ आक्रमक
स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष; वाहनचालकांना करावी लागते कसरत
रत्नागिरी, ता. २ ः तालुक्यातील वरवडे ते जयगडकडे जाणारा रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे. मागील अनेक महिने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी सरपंच निखिल बोरकर तसेच येथील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
वरवडे ते जयगड या रस्त्यालगत मागील काही दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. या खोदकामामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याच्या बाजूला साईडपट्टीलगत चर मारण्यात आले आहेत. या चरांमुळे गाड्यांचा अपघात होण्याचा मोठा धोका आहे. या चरांमध्ये गाईगुरे अडकून पडत आहेत. त्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थ प्रचंड हैराण झाले आहेत. चरांमध्ये अडकेलेली जनावरे बाहेर काढताना ग्रामस्थांना मेहनत घेताना आर्थिक त्रासदेखील सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्त करावा यासाठी येथील ग्रामस्थांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून प्रत्यक्ष भेटूनही अद्यापही या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. पुढील चार दिवसात रस्त्याची दुरुस्ती हाती न घेतल्यास स्थानिक ग्रामस्थांना घेऊन बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे बांधकामच्या अधिकाऱ्यांची तक्रार करणार असल्याचे माजी सरपंच बोरकर यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.