जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर 
पहिल्या टप्प्यात भातलागवड

जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर पहिल्या टप्प्यात भातलागवड

Published on

94670

जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर
पहिल्या टप्प्यात भातलागवड

खरीप हंगाम ः पुढील पुर्नलागवड पावसावर अवलंबून

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ ः जिल्ह्यातील ६३ हजार हेक्टरपैकी १५ हजार हेक्टरवरील भातरोप पुर्नलागवड पूर्ण झाली आहे. पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यास पुढील पंधरा ते वीस दिवसांत भातरोप पुर्नलागवड पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
सिंधुदुर्गात खरीप हंगामात गेल्या वर्षी ६२ हजार हेक्टरवर भातपिक लागवड केली जात होती. परंतु, यावर्षी त्यामध्ये वाढ होण्याचा अंदाज असून कृषी विभागाच्या अंदाजानुसार ६३ हजार हेक्टरवर भातपिक लागवड होणार आहे. यावर्षी मॉन्सूनचे आगमन ६ जूनला झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील भातरोप वाटीका तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली. तत्पूर्वी पावसाच्या पाण्यावर आणि मॉन्सूनपुर्व पाऊस झाल्यानंतर १० ते १२ टक्के रोपवाटीका तयार केल्या होत्या. जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील भातरोप वाटीकेतील रोपांची पुर्नलागवड अंतिम टप्प्यात असून नियमित रोपांची पुर्नलागवड देखील पाच-सहा दिवसांपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवर भातरोप पुर्नलागवड पूर्ण झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे पाणथळ जमिनीतील अधिकत्तर भातरोप लागवड पूर्ण केली आहे. परंतु, गेले दोन दिवस पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा वरकस जमिनीतील लागवड सुरू केली आहे. पावसामुळे जिल्ह्यात गतीने लागवड सुरू असून पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास पुढील पंधरा ते वीस दिवसांत भातरोप लागवड पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.