मालवणात १३ ला 
माजी सैनिक मेळावा

मालवणात १३ ला माजी सैनिक मेळावा

Published on

मालवणात १३ ला
माजी सैनिक मेळावा
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेव्हीमधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या निवृत्तीवेतन व त्यासंबंधी इतर काही अडीअडचणींचे निरसन करण्यासाठी १३ जुलैला सकाळी १०.३० वाजता मालवण येथील सैनिकी विश्रामगृह येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहायक सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी यांनी दिली. आय.एन.एस. आंग्रे मुंबई यांच्यामार्फत राज्यातील ३२ जिल्ह्यांतील ऐतिहासिक स्थळांना व समुद्र किनारपट्टीतील भागांना भेटी देण्यासाठी महा कनेक्ट (maha connect) या नावाने मोटार रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीची सुरुवात मुंबई येथून होणार असून, त्यामध्ये नेव्हीतील १२ अधिकारी व ४ जवानांचा समावेश आहे. या रॅलीचे आगमन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी विश्रामगृह येथे होणार आहे. जिल्ह्यातील नेव्हीमधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी वा विधवा पत्नींनी आपले सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्र, पीपीओ व बँक पासबुक या कागदपत्रांसह १३ जुलैला सकाळी १०.३० वाजता सैनिकी विश्रामगृह मालवण येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
..............
ॊ‘मुख्यमंत्री वयोश्री’
योजनेचा लाभ घ्या!
सिंधुदुर्गनगरी : राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाय योजनांसाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदीकरिता व मनःस्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ''मुख्यमंत्री वयोश्री'' योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात ३००० रुपये थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
निरंजन दीक्षितांची
संचालकपदी निवड
देवगड ः येथील दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांची जामसंडे येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. मागील सुमारे वीस वर्षे ते संस्थेचे सल्लागार होते. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. आता त्यांची संस्थेच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.