जल जीवनच्या 445 योजनांचे सुधारित अंदाजपत्रक

जल जीवनच्या 445 योजनांचे सुधारित अंदाजपत्रक

Published on

जलजीवनच्या ४४५ योजनांसाठी सुधारित अंदाजपत्रक
जिल्ह्याचा आराखडा ११०० कोटी पार करणार; १ हजार ४३२ पैकी ४०० कामे पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ४३२ पाणी पुरवठा योजना हाती घेतल्या आहेत. त्यापैकी ४०० योजनांची कामे पूर्ण झाली असून ५८७ योजनांचे काम अंतिम टप्प्यात आहेत. ४४५ योजनांचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचे काम जिल्हा परीषद पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. जिल्ह्याचा आराखडा ११०० कोटीचे आहे.
जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत. या योजनेच्या माध्यमातून ९ तालुक्यांमध्ये १ हजार ४३२ योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेतली आहेत. यामधील ४०० योजनांची कामे पूर्ण केली आहेत. या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग केल्या आहेत.
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत. जिल्ह्यात १ हजार ४३२ पैकी ४४५ योजनांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व योजनांचे सुधारित अंदाजपत्रक तयार करावे लागणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

चौकट
८० टक्के तक्रारी निकाली
जिल्ह्याचा १ हजार १०० कोटींचा आराखडा होता. त्यामध्ये आता सुधारित अंदाजपत्रकामुळे वाढ होणार आहे. साधारण सप्टेंबर २०२४ पर्यंत या सर्व योजना पूर्ण करण्याचा मानस आहे. तसे आदेशही संबंधित ग्रामपंचायत व ठेकेदारांना दिले आहेत. आत्तापर्यंत ११० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी ८० टक्के तक्रारी निकाली काढल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.