चिपळुणात ऐन पावसाळ्यात पाणीसंकट

चिपळुणात ऐन पावसाळ्यात पाणीसंकट

Published on

ऐन पावसाळ्यात
चिपळुणात पाणीसंकट

चिपळूण, ता. ८ : शहरातील गोवळकोट तिठा परिसरात मोठ्या पऱ्यामध्ये असणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने पावसाळ्यात चिपळूण शहरातील अर्ध्या भागावर पाणीसंकट निर्माण झाले आहे. या पऱ्याला पाणी अधिक असल्याने दुरुस्तीचे काम लांबणीवर पडणार असल्याने मुरादपूर, पेठमाप, गोवळकोट रोड, उक्ताड भागातील पाणीपुरवठा अनिच्छित काळासाठी बंद राहणार आहे.चिपळूण शहरातील गोवळकोट टाकीवरून जाणारी १२ इंचाची मुख्य जलवाहिनी गोवळकोट तिठा येथे सातत्याने फुटते. रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी, नाले, पऱ्हे यांची पाणीपातळी वाढली आहे. अशातच पुन्हा गोवळकोट येथे मुख्य पाईपलाईन फुटण्याचा प्रकार घडला. पऱ्याला पाणी असल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे शहरातील अर्ध्या भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.