-समुद्र खवळल्याने गणपतीपुळ्यात खबरदारी

-समुद्र खवळल्याने गणपतीपुळ्यात खबरदारी

Published on

- rat९p४५.jpg-
२४M९६००४
गणपतीपुळे ः समुद्र खवळल्यामुळे येथील किनाऱ्यावर मोठ्या लाटा फुटत होत्या.
------------

समुद्र खवळल्याने गणपतीपुळ्यात सतर्कता

विनायक चतुर्थीमुळे गर्दी ; चौपाटीवर न जाण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे गणपतीपुळे येथे पर्यटकांनी समुद्र चौपाटीवर जाऊ नये असे स्थानिक प्रशासनासह गणपतीपुळे पोलिसांनी सुचना केल्या आहेत. तसेच सेल्फी काढण्यासाठी किनाऱ्यावर पाण्याच्या जवळ जाणाऱ्यांना जीवरक्षकांकडून माघारी बोलावण्यात येत आहे.
गणपतीपुळे व परिसरात गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे अनेकांच्या शेतामध्ये पाणी असल्याने मोठे नुकसान झालेले आहे. सोमवारी (ता. ८) सायंकाळी पडलेल्या पावसाने भगवतीनगर निवेंडी परिसरातील पुलांवरून पाणी वाहत होते. तसेच भंडारपुळे पुलावरून पाणी जात होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. समुद्राला उधाण आल्यामुळे लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. मंगळवारी (ता. ९) विनायकी चतुर्थी असल्यामुळे श्रींचे भक्त गणपती दर्शनासाठी दाखल झाले होते. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर काहीजणं किनाऱ्यावर जात होते. सुरक्षिततेसाठी त्या पर्यटक किनाऱ्यावर जाऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.