बांदिवडे -भगवंतगड पुल वाहतुकीस धोकादायक

बांदिवडे -भगवंतगड पुल वाहतुकीस धोकादायक

Published on

96394

बांदिवडे -भगवंतगड पुल
वाहतुकीस धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ११ः परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बांदिवडे भगवंतगड जोडणाऱ्या पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे पूल वाहतूकीस धोकादायक बनले आहे. याबाबत स्थानिक व राज्य प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी शिंदे गट शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते आशिष नाबर यांनी केली आहे .
आचरा चिंदरमार्गे बांदिवडे, मसुरे, ओरोस आदी भागात जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून भगवंतगड पुलाचा उपयोग केला जातो. सोमवारी (ता. ८) झालेल्या मुसळधार पावसामुळे या पुलाची मोठ्या प्रमाणात धूप झाली. त्यामुळे हे पूल वाहतूकीस धोकादायक बनले आहे. आचरा हायस्कूलला जाणारया विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. याबाबत पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, किरण सामंत यांनी गांभिर्याने लक्ष द्यावे. येथील स्थानिक आमदार हे फक्त कुडाळमध्येच व्यस्त आहेत. त्यांना या पुलाच्या दुर्दशेकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी टिकाही श्री. नाबर यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.