

कणकवली येथे
निबंध स्पर्धा
कणकवली ः कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज, कणकवलीतर्फे श्रीमंत पूर्णानंद भवनाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने कणकवली तालुका ज्ञाती बांधव मर्यादित निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शालेय आणि खुल्या अशा दोन गटांत होईल. वय वर्ष २१ पर्यंत शालेय गटासाठी विषय असे ः पहिला विषय ‘दहावी ते बारावीसाठी खासगी शिकवणी आवश्यकच आहे का?’, दुसरा विषय - ‘व्यक्तिमत्व विकासात पालकांची भुमिका काय असावी?’, तिसरा विषय - ‘शारिरीक आणि मानसिक तंदुरूस्तीसाठी मैदानी खेळ कसे आवश्यक ठरतात?’, ‘प्लास्टिक मुक्त जग, माझे विचार आणि उपाय’. वय वर्ष २१ पुढील खुल्या गटासाठी विषय असे ः ‘समाज माध्यमे ज्ञान आणि माहितीसाठी कितपत उपयोगी?’, ‘संस्कृती संवर्धनात धर्म आणि जात यांची भूमिका’, ‘जुन्या धार्मिक आणि सामाजिक परंपरा निरामय जीवनासाठी कशा पुरक होत्या?’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता शाप की वरदान?’. शालेय गटासाठी शब्द मर्यादा ३०० शब्दांची तर खुल्या गटासाठी ५०० शब्दांची आहे. स्पर्धकांनी निबंध बंद लिफाफ्यात त्यावर नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह १६ जानेवारी रोजीपर्यंत राजू आजगावकर, प्रथमेश महाजन, मंदार अवसरे, प्रथमेश सामंत, सुयोग टिकले यांच्याकडे द्यावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.