राणेंनी चव्हाणांची अकार्यक्षमता दाखवली ः नाईक
राणेंनी चव्हाणांची अकार्यक्षमता दाखवली ः नाईक
कणकवली, ता. २९ : ‘‘माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न न सुटल्यामुळेच नीतेश राणेंच्या कालच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी झाली होती. यामाध्यमातून राणेंनी स्वतःच्याच पक्षातील माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची अकार्यक्षमा दाखवली. त्यासाठीच राणेंनी जनता दरबार आयोजित केला होता का?’’ असा प्रश्न माजी आमदार वैभव नाईक यांनी आज उपस्थित केला.
नाईक म्हणाले, ‘‘विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट २०२४ मध्ये तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी हजारो तक्रारी, प्रश्न आल्याचे आणि ते प्रश्न मार्गी लावल्याचे जाहीर केले. मात्र ते प्रश्न अद्यापही न सुटल्यामुळेच राणेंच्या कालच्या जनता दरबाराला गर्दी झाली होती. तीन वर्षे भाजपची सत्ता असूनही जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, लोकांना जनता दरबारात गर्दी करावी लागते हे दुर्दैव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.