वेगाने वाऱ्यामुळे आंबा नुकसान झाल्यास तक्रार करा

वेगाने वाऱ्यामुळे आंबा नुकसान झाल्यास तक्रार करा

Published on

आंबा नुकसान झाल्यास तक्रार करा
शिवकुमार सदाफुले ; वाऱ्याचा परिणाम, ३६ हजार ४६८ विमाधारक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः जिल्ह्यात २५ किलोमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने वारे वाहून आंबापीकांचे नुकसान झाल्यास फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासात विमा कंपनीकडे किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार २०२४-२५ मध्ये आंबा-काजू पिकाकरिता भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात फळपीक विमा योजनेत आंबा पीकासाठी ३० हजार १३५ शेतकऱ्यांनी व काजू पीकासाठी ६ हजार ३३३ असे एकूण ३६ हजार ४६८ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतलेला आहे. संभावित हवामान धोके, महसूल मंडळनिहाय स्थापित केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारावेग, आर्द्रता इत्यादी माहिती स्वयंचलितरित्या नोंदवली जाते. या माहितीच्या आधारे शासननिर्णयामध्ये निर्धारित केलेल्या कालावधीत हवामान धोके लागू झाल्यानंतर विमाधारक शेतकरी यांना नुकसान भरपाई लागू होते.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण झाले असून, वेगाचे वारे २५ किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबापीकांचे नुकसान झाले असल्यास फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासात विमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. संबंधित विमा कंपनी, महसूल विभाग व कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तीक पातळीवर पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार दाखल न केल्यास हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद ही नुकसान भरपाईसाठी पात्र होणार नाही.
----
परतावा मिळण्यासाठीची रक्कम
विमा परतावा मिळण्यासाठी आवश्यक असणारी हवामान प्रमाणके पुढीलप्रमाणे ः आंबापीक ः वेगाचा वारा - १६ एप्रिल ते १५ मे कालावधीत २५ किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त, १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ किमी प्रतितास राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम २० हजार २६ प्रतिहेक्टर देय राहील. १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ किमी प्रतितासापेक्षा जास्त राहिल्यास नुकसानभरपाई रक्कम ३४ हजार रुपये प्रतिहेक्टर राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com