अवकाळी पावसाने दोन दिवसात महावितरणला दणका

अवकाळी पावसाने दोन दिवसात महावितरणला दणका

Published on

वळवाचा महावितरणला दणका
वीजपुरवठा वारंवार खंडीत ; सर्वसामान्य त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः गतवर्षी मॉन्सूनच्या आगमनावेळी महावितरणचा पुरता बोजवारा उडाला होता. अनेक भागात चार ते पाच दिवस वीजपुरवठा खंडीत झालेला होता. या अनुभवातून धडा घेऊन यंदा पावसाळ्यात राजापूरकरांना अखंडीत वीजपुरवठा होईल अशी राजापूरकरांची अपेक्षा होती. पण पावसाळा तोंडावर आला तरीही महावितरण सज्ज झालेले नाही. गेल्या दोन-तीन दिवसात तालुक्याच्या विविध भागात झालेल्या वळवाच्या पावसाने अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. लग्नसराईत वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे वऱ्हाडी मंडळींसह व्यापारीही त्रस्त झाले आहेत. गेले आठ महिने दर सोमवारी देखभाल दुरुस्तीसाठी बंद केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे महावितरणने नेमकी कसली दुरुस्ती केली असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com