शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा
नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
हेमंत फाटक ः शिरगाव भात संशोधन केंद्रात कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः रासायनिक खतांबरोबर नैसर्गिक किंवा सेंद्रिय खताचा वापर शेतकऱ्यांनी करावा. टप्प्याटप्याने सेंद्रिय खतांचा वापर वाढवत नेत रासायनिक खतांचा वापर बंद करणे शेतमाल उत्पादनासाठी योग्य ठरेल, शेतीतील अधोगतीला सामोरे जाण्याऐवजी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन प्रगतशील शेतकरी हेमंत फाटक यांनी केले.
रत्नागिरी तालुका कृषी विभागातर्फे खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा शिरगाव येथील भात संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी हेमंत फाटक यांनी मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपिठावर तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, कृषितज्ज्ञ संदीप कांबळे उपस्थित होते. हेगडे यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके, लागवड पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. शिरगाव येथील भात संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी खरीप हंगामपूर्व नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. कांबळे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व विशद करून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल माहिती दिली. या वेळी दृकश्राव्य माध्यमातून पाणी फाउंडेशनतर्फे गटशेतीबाबत माहिती देण्यात आली. मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भुवड यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी पीक संग्रहालयास भेट देऊन भाताच्या वाणाबाबत माहिती घेतली. या वेळी आत्मा विभागाच्या बीटीएस हर्षला पाटील, संकेत पवार, शेतकरी उत्पादक कंपनी व गटाचे सभासद, तालुक्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.