वामन रांगणकर यांचे निधन

वामन रांगणकर यांचे निधन

Published on

-rat१६p८.jpg-
२५N६४१७७
वामन रांगणकर
---
गणेशगुळ्याचे माजी सरपंच
वामन रांगणकर यांचे निधन
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे गावचे माजी सरपंच वामन गोपाळ तथा आप्पा रांगणकर (वय ८२) यांचे निधन झाले. अप्पा रांगणकर यांनी १९८१ ते १९९२ अशी सलग बारा वर्षे सरपंचपद भूषवले. या कार्यकाळात त्यांनी गावात विविध विकासकामे केली. त्याकरिता त्यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचेही मार्गदर्शन लाभले. १९८८ मध्ये सुरुबनाची लागवड मोठ्या प्रमाणात समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आली. आज जे सुरूबन दिसत आहे ते त्यांच्या पुढाकारने लावण्यात आले होते. रांगणकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गणेशगुळ्याच्या विद्यमान सरपंच श्रावणी रांगणकर यांचे ते सासरे होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com