महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक लढणार
- rat१९p१.jpg-
२५N६४७६९
रत्नागिरी ः तालुक्यातील नांदिवडे येथील कबड्डी स्पर्धेत नाणेफेक करताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत प्रसाद उर्फ बाबू पाटील अन्य मान्यवर.
----
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक लढणार
उदय सामंत ः नांदिवडेतील बाबू पाटील मित्रमंडळ कबड्डी स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : लाल मातीतील कबड्डी खेळ हा राज्यापुरता मर्यादित नसून, तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे. येथील स्पर्धांमधून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करणे आवश्यक आहे. रत्नागिरीसह कोकणातील खेळांडूवर राज्यस्तरावर अन्याय होतो, हे आपण गेली तीन वर्षे पाहिले आहे. येथील खेळाडूंवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक लढावी लागेल. यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
तालुक्यातील नांदिवडे येथील श्री चंडिकादेवी नांदिवडे ग्रामस्थ आयोजित, बाबूशेट पाटील मित्रमंडळ पुरस्कृत पुरुष व महिलागटांच्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद उर्फ बाबू पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती ऋतुजा जाधव, माजी सभापती मेघना पाष्टे, शाखाप्रमुख शिरधनकर, काव्या शिरधनकर, प्रमोद घाडगे, जयवंत आढाव, संदीप शिरधनकर, विभागप्रमुख बाबय कल्याणकर, बाबय फटकळे, अक्षय मेनये, कमलेश बापट, सुयोग बिवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सामंत म्हणाले, जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय किंवा आंतराष्ट्रीय स्तरावर खेळले पाहिजेत, ही आपली अपेक्षा आहे. यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा पुरवल्या जातील. खेळाच्या पूर्वतयारीसाठी मैदानासह आवश्यक साहित्य शासन व कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून आपण करू. मी खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे; परंतु सुविधा दिल्यानंतर खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करत राज्य, राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे अपेक्षित आहे. मी कबड्डी असोसिएशनचा जिल्ह्याचा अध्यक्ष झालो आहे. हे जिल्ह्यापुरते मर्यादित राहण्यासाठी नाही. भविष्यात महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक मी लढणार आहे. केवळ कोकणातील मुलांना न्याय देण्यासाठी राज्यस्तरावरील संघटनेत आपली ताकद निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे कोकणाची ताकद राज्यस्तरावर नक्की निर्माण करू, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.
कोट
जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू तंदुरुस्त राहावे यासाठी दोन हजार खेळाडूंना आपण प्रशिक्षण देणार आहोत. खेळ कोणताही असो तो खिलाडूवृत्तीने खेळला गेला पाहिजे. खेळामध्ये यापुढे दादागिरी चालणार नाही. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल. राज्यात काही ठिकाणी निकाल विरोधात दिल्यामुळे पंचांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. हा प्रकार यापुढे जिल्ह्यात खपवून घेतला जाणार नाही.
- डॉ. उदय सामंत, पालकमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.