-पावसाळ्यातील महावितरण कंपनीची कसोटी

-पावसाळ्यातील महावितरण कंपनीची कसोटी

Published on

पावसात महावितरणची कसोटी
खंडित वीजपुरवठा; कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्यावर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : जिल्ह्यात रोज जोरदार मॉन्सूनपूर्व पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम वीजपुरवठ्यावर होत आहे. वीजपुरवठा खंडित होणे हे वीजग्राहकांना जेवढे नकोसे आहे तेवढेच महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनादेखील नकोसे आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंते व कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे; परंतु कोणत्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम पर्यायी वीजयंत्रणेमधून वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
ज्या भागात उपरी (ओव्हरहेड) वीजवाहिन्या आहेत तेथील वीजखांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पिन किंवा डिस्क इन्सुलेटर तसेच डबलपोल स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सुलेटर हे चिनी मातीचे असतात. उन्हात चिनीमातीचे इन्सुलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की, इन्सुलेटरला तडे जातात. वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारण म्हणजे वादळवाऱ्यांमुळे वीजयंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे वा कडकडाटामुळे दाब वाढणे तसेच अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने फिडरपिलर, रिंग मेन युनिट अशा वीजयंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्यादृष्टीने रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खऱ्या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. त्यामुळे वीजग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com