जेल नाका येथे अहिल्यादेवींचे स्मारक व्हावे

जेल नाका येथे अहिल्यादेवींचे स्मारक व्हावे

Published on

----rat२४p१.jpg-
२५N६५९९०
रत्नागिरी : शहरात अहिल्यादेवींचे स्मारक होण्यासंबंधी मागणीचे निवेदन भाजपच्यावतीने देताना जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व पदाधिकारी.
----
शहरात अहिल्यादेवींचे स्मारक व्हावे
भाजपची मागणी ; ३००वी जयंती साजरी होणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अहिल्यादेवी होळकर यांची ३००वी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी केली जाणार आहे. अष्टपैलू आणि आदर्शवत अहिल्यादेवींचे स्मारक रत्नागिरी शहरामध्ये व्हावे, अशी मागणी भाजपने केली आहे. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व नगरपालिकेकडे ही मागणी केली आहे.
अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य अनेक शतकानंतरदेखील सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी सर्वच क्षेत्रात केलेले काम या सर्वांचा आजही आदर्श घेण्यासारखा आहे. सध्या रत्नागिरी शहरामध्ये जेलनाका चौक या ठिकाणी तुळशी वृंदावन लावून सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणी संघर्षमय जीवन जगणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी भाजपाच्या माध्यमातून करण्यात आली. निवासी जिल्हाधिकारी सूर्यवंशी, मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे निवेदन देत ही मागणी करण्यात आली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नीलेश आखाडे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, मंदार खंडकर, गुरूप्रसाद फाटक, दीपक आपटे, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com