पावसामुळे महावितरणचे 39 लाखाचे नुकसान

पावसामुळे महावितरणचे 39 लाखाचे नुकसान

Published on

पावसामुळे महावितरणचे ३९ लाखाचे नुकसान
एक हजार १५३ गावे प्रभावित ; ३ लाख ३१ हजार ७१७ ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत
रत्नागिरी, ता. २४ : जिल्ह्यात सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे महावितरण कंपनीला चांगलाच फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील १ हजार १५३ गावे प्रभावित झाली असून, त्यापैकी १ हजार १४२ गावांचा विद्युतपुरवठा सुरळीत झाला आहे. यामुळे ३ लाख ३६ हजार ९६ ग्राहक बाधित झाले होते. त्यापैकी ३ लाख ३१ हजार ७१७ ग्राहकांचा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे; मात्र या नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणचे ३९ लाखाचे नुकसान झाले आहे.
२१ ते २३ मे दरम्यान झालेल्या वादळीवारा व मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बाधित झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचारी व अधिकारी अथक परिश्रम घेत अहोरात्र काम करत आहेत. जिल्ह्यातील १८ उपकेंद्रे बाधित झाली. ती सर्व पूर्ववत करण्यात आली. १३० उच्चदाब वाहिन्या बाधित झाल्या होत्या त्यापैकी १०१ पूर्ववत केल्या. ११६ विद्युतखांब पडले होते. त्यापैकी ५७ पूर्ववत केले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. पडलेल्या ६१ उच्चदाब विद्युतखांबांपैकी २२ पूर्ववत केले. जिल्ह्यातील ५ हजार ५७५ रोहित्रे नादुरुस्त झाली होती. त्यापैकी ५ हजार ५२२ दुरूस्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com