ःआरवलीच्या गरम पाण्याच्या कुंडात चिखलाचे साम्राज्य

ःआरवलीच्या गरम पाण्याच्या कुंडात चिखलाचे साम्राज्य

Published on

आरवलीत गरम पाण्याच्या कुंडात चिखल
रस्ता रुंदीकरणाचा फटका ; प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २९ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका महामार्गावरील आरवली गावाला बसत आहे. येथील ऐतिहासिक गरम पाण्याची कुंडे समस्यांच्या गर्तेत सापडली आहेत. या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे गरम पाण्याची कुंडे चिखलाने भरून गेली आहेत. आजूबाजूची माती या कुंडात वाहून आली आहे.
सध्या हे ऐतिहासिक ठिकाण चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आले आहे. ठेकेदाराने खरंतर, मे महिन्यांपूर्वी हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची गरज होती; परंतु रेंगाळलेल्या कामाचा फटका सध्या गरम पाण्याच्या कुंडाला बसला आहे. गरम पाण्याच्या कुंडावर अनेक लोक दररोज अंघोळ करतात. शिवाय गंधकयुक्त पाणी असल्याने हे पाणी त्वचाविकार दूर होण्यासाठी अनेक लोक स्नानासाठी आवर्जून घेऊन जातात. त्वचाविकारांवर अतिशय गुणकारी असलेले गंधयुक्त पाणी निसर्गतः आरवली येथे उपलब्ध असल्याने या गरम पाण्याच्या कुंडांना विशेष महत्व आहे. शेकडो पर्यटक सहली, निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून येतात. आरवलीची ओळख असलेल्या या गरम पाण्याच्या कुंडाकडे रस्ता रुंदीकरणामुळे बकालीकरण व थेट कुंडांच्या अस्तित्वालाच धोका पोहचत आहे. या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी गेले कित्येक दिवस गावातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com