-उमेदच्या महिला प्रभागसंघाच्या हाऊसबोटी आल्या किनाऱ्यावर
‘उमेद’च्या तीन हाऊसबोटी किनाऱ्यावर
ग्रामीण जीवनोन्नती अभियान; पावसाळ्यानंतर पुन्हा पर्यटनाला चालना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील उमेदच्या महिला प्रभागसंघांना देण्यात आलेल्या हाऊसबोट आता पावसाळी वातावरणामुळे किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत. तालुक्यातील कोतवडे आणि वाटद प्रभागांना देण्यात आलेल्या हाऊबोट तवसाळ खाडीकिनाऱ्यावर उभ्या केल्या आहेत तर चिपळूण तालुक्यातील मालदोली प्रभागाची बोटही इथल्या खाडीकिनारी उभी आहे. पावसाळी हंगामानंतर सप्टेंबर महिन्यात हवामानाचा अंदाज घेऊन या हाऊसबोटी पुन्हा पर्यटन व्यवसायासाठी सज्ज होतील.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, गुहागर, मंडणगड, राजापूर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यातील बचतगटांच्या महिलांनी आता हाऊसबोट प्रकल्पाचा प्रस्ताव सिंधुरत्न समृद्धी योजनेतून सादर केला होता. या प्रकल्पाना मंजुरी मिळून जिल्ह्यातील पाच प्रभागसंघांना हाऊसबोटीसाठी १ कोटीप्रमाणे ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील जीवनज्योती महिला प्रभागसंघ आणि कोतवडे येथील एकता प्रभागसंघांच्या हाऊसबोटीचे लोकार्पण करण्यात आले. वेळेआधीच पावसाने हजेरी लावल्याने आता या तिन्ही हाऊसबोटी किनाऱ्यावर सुरक्षितरीत्या उभ्या करण्यात आल्या आहेत. पावसाळी हंगामात इतर बोटीप्रमाणेच हाऊसबोटींनाही खाडीत अथवा समुद्रात जाण्यास मनाई असल्याने आता या बोटी खाडीकिनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात असणारा पाऊस तसेच वेधशाळेचा अंदाज लक्षात घेऊन या बोटी पुन्हा पर्यटकांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.