-मनरेगातून फळबाग लागवडीसाठी १०० टक्के अनुदान
फळबागेसाठी १०० टक्के अनुदान
कृषी विभाग ; मनरेगातून बांबू लागवडीलाही चालना देणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, चिकू इत्यादी फळपिकांची तसेच बांबू लागवड करता येते. त्यासाठी १०० टक्के अनुदान उपलब्ध आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान फळबाग व बांबू लागवडीसाठी चांगले आहे. शेतीमधून शाश्वत स्वरूपाचे उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी फळबाग लागवडीकडे वळणे आवश्यक आहे. जून महिना हा फळबाग लागवडीसाठी योग्य कालावधी आहे. जूनमध्ये लागवड केलेल्या कलमांची वाढ जोरदार होते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जून महिन्यामध्ये फळपिकाची व बांबूची लागवड करण्याचा प्रयत्न करावा. मनरेगाअंतर्गत शेतकरी बांधवांना ५ गुंठे ते २ हेक्टर क्षेत्रापर्यंत फळबाग लागवड करता येते. यामध्ये पहिल्या वर्षी ६० टक्के, दुसऱ्या वर्षी २० टक्के व तिसऱ्या वर्षी २० टक्के याप्रमाणे अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकरी म्हणजे २ हेक्टर व त्यापेक्षा कमी जमिनधारणा असलेले शेतकरी लाभ घेऊ शकतात. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना जमिनधारणेची अट नाही. लाभ घेऊ इच्छित शेतकऱ्यांकडे नरेगाचे जॉबकार्ड आवश्यक आहे. योजनेंतर्गत फळबाग व बांबू लागवडीसाठी लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी अर्ज व त्यासोबत सातबारा उतारा, ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, जॉबकार्ड, संमतीपत्र, ग्रामसभा ठराव इत्यादी कागदपत्रे ग्रामस्तरीय सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावीत. अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी आधिकारी किंवा तालुका कृषी आधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.