जिल्ह्यातील ''त्या'' बदल्यांबाबत तक्रार करणार

जिल्ह्यातील ''त्या'' बदल्यांबाबत तक्रार करणार

Published on

जिल्ह्यातील ''त्या'' बदल्यांबाबत तक्रार करणार
परशुराम उपरकर ः चुकीच्या पद्धतीने कार्यवाही झाल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ५ ः जिल्हाधिकारी ३१ मेपासून ३ जूनपर्यंत जिल्ह्यात नव्हते असे असतानाही त्या काळात झालेल्या बदल्यांच्या आदेशावर जिल्हाधिकाऱ्यांनी ऑफलाइनसारख्या सह्या केल्या आणि याचे आदेश ३ जूनला काढण्यात आले, असा आरोप करत खनिकर्म विभागातील ''त्या'' अधिकाऱ्याला का मुदवाढ देण्यात आली? याबाबातची मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव महसूल आणि आयुक्त या सर्वांकडे मी स्वतः तक्रार करणार आहे. पालकमंत्र्यानी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते.
ते म्हणाले, "जिल्हाधिकारी कार्यालायतून ज्या बदल्या झाल्या आहेत, त्या चुकीच्या पद्धतीने होत आहेत. जिल्हा खनिकर्म विभाग जो सेन्सिटिव्ह म्हटला जातो, त्या विभागाबाबत प्रत्येक जणांच्या तक्रारी आहेत. पर्यावरणाच्या तक्रारी आहेत. आम्ही कासार्डेतील प्रश्नाबाबत केलेली तक्रार असू दे किंवा आज सावंतवाडीमध्ये असलेल्या तक्रारी असू दे, या तक्रारी असताना त्या ठिकाणी देवगड तालुक्यातला तहसीलदारांना खनिकर्म विभागाकडे प्रभारी नेमण्यात आले. देवगड तालुका मोठा असताना तो तालुका सोडून या खनिकर्म विभागाचा चार्ज देण्यापेक्षा जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार किंवा क्लास-वन अधिकारी भरपूर आहेत. त्यांच्याकडे खनिकर्मचा चार्ज देण्याची गरज होती. पण, याच्यामध्ये कुठे काहीतरी गौडबंगाल दिसत आहे. जिल्हा प्रशासनामध्ये अनेक कर्मचारी, तलाठी रिक्त पदे आहेत. जिल्ह्यात रिक्त पदे असताना आंतरजिल्हा बदलीमध्ये कर्मचाऱ्यांना सोडले गेले.
सिंधुदुर्ग जिल्हा हा भरती केंद्र झालेला आहे. जिल्ह्यात भरती व्हायचं आणि तीन, चार वर्षे, पाच वर्ष, सहा वर्षांनी पण आपल्या जिल्ह्यात जायचं. ही जिल्ह्यातील प्रथा थांबली पाहिजे. याबाबत पालकमंत्री लक्ष घालणार का? पालकमंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत, म्हणजे त्यांचा या सगळ्याला पाठिंबा आहे काय? जिल्ह्यात ज्या महसुली कार्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या आणि मर्जीतील अधिकाऱ्याला मुदतवाढ या विषयावर मी वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे."

चौकट
‘त्या’ अधिकाऱ्याला अजून मुदतवाढ का?
जिल्हा खनिकर्म विभागांमध्ये निरीक्षक म्हणून जे महसूल अधिकारी आहेत, त्यांना मुख्यालयात आठ तर खनिकर्म विभागामध्ये चार वर्षे झालेली आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करूनही त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. चार वर्ष महसुल आणि चार वर्ष खनिकर्म विभागात आहेत आणि त्यांना अजून एक वर्ष मुदतवाढ दिलेली आहे. शासनाचे परिपत्रक आणि शासन निर्णय असा आहे की, सहा वर्ष मुख्यालयात झाल्यानंतर त्यांची बदली होणे गरजेचे आहे. पण, त्या अधिकाऱ्याला का मुदतवाढ दिली? यातून काय साध्य होणार आहे? तो अधिकारी लाडका आहे का? त्या अधिकऱ्याकडे माहिती मागितल्यांवर अर्धवट माहिती देऊन लोकांची दिशाभूल करतात. अनेक ठिकाणींची आम्ही पण माहिती मागितल्यांवर अर्धवट माहिती दिली. कालच एका प्रकरणातील तक्रारारीची सुनावणी होती. पण, त्या अपीलामध्ये अर्धवट माहिती दिली. चुकीची माहिती जिल्हाधिकाऱ्यां देऊन, त्या अधिकाऱ्याला अजून मुदतवाढ का? असा सवाल श्री. उपरकर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com