जलतारा खड्डे खोदाईसाठी शेतकऱ्यांना अनुदान

जलतारा खड्डे खोदाईसाठी शेतकऱ्यांना अनुदान

Published on

खड्डे खोदाईसाठी शेतकऱ्यांना अनुदान
रोहयोतून नोंदणी करावी; जनजागृतीची गरज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १०ः शेतात शोषखड्डे खोदून येथील जलस्तर वाढवता येतो. यासाठी शासनातर्फे जलतारा योजना राबवली जात आहे. या योजनेतंर्गत शेतात शोषखड्डे खेदण्यासाठी नोंदणी करावी लागते. जिल्ह्यात मात्र याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. शेतातील जलस्तर वाढावा यासाठी शेतकऱ्यांना शोषखड्डे खोदण्यासाठी प्रवृत्त करणे अत्यंत आवश्यक आहे.
जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडत असला तरी पावसाचे पाणी जमिनीवाटे नदी, नाल्यांवाटे समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भूगर्भातील पाण्याची पातळी खालवत असल्याचे जिल्ह्यातील अनेक गावे वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. काही ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये महापुराचा सामना करावा लागतो. भविष्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी शोषखड्डे खोदाई करणे आवश्यक आहेत. शोषखड्यांची खोदाई केल्यास उन्हाळ्यात पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. शेतात पाच चौरस फुटांचे खड्डे विविध भागात खोदल्यास पावसाचे पाणी वाहून जाणार नाही. ते अधिकाधिक प्रमाणात जमिनीत मुरणार. यामुळे शेतात अधिकाधिक ओलावा राहील.

कृषी सहाय्यकांशी संपर्क
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक गावातील शेतांमध्ये जलतारा योजना राबवण्याची सूचना राज्यशासनाने दिली आहे. त्यामुळे एका खड्ड्यासाठी ४ हजार ६८३ रुपये अनुदान देण्यात येते. हे अनुदान लाभार्थ्यांच्या बॅंकखात्यात जमा होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते. त्यासाठी ग्रामरोजगार सेवक तसेच कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com