शाळेत उत्तम संस्कार झाले तरच विद्यार्थी चारित्र्य संपन्न
rat१३p१०.jpg-
P२५N७०३२१
सावर्डे ः प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना अनंत जाधव.
---
संस्कारातून विद्यार्थी चारित्र्य संपन्न बनेल
अनंत जाधव ः शिक्षकांची वरिष्ठ, निवड श्रेणी प्रशिक्षण प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे ता. १३ : ‘शाळा शाळांमध्ये उत्तम संस्कार झाले तरच समाजात जाणारा प्रत्येक विद्यार्थी हा चारित्र्यसंपन्न बनेल’, असे मत सुलभक अनंत जाधव यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेतर्फे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्यामार्फत सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना बोलत होते. जाधव म्हणाले, समाजात परिवर्तन व्हावे असे वाटत असेल तर शिक्षकांचे विचार समृद्ध असायला हवेत. शिक्षकांनी असा विचार करावा की, तुमच्या विचारावर दुसऱ्याने विचार करायला हवा. समाजातील प्रत्येक व्यक्ती ही शाळेतून संस्कार घेऊन जात असते. त्यामुळे शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्यावर उत्तम संस्कार देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावे. जाधव यांनी उच्च माध्यमिक व माध्यमिक गटातील शिक्षकांना हसतखेळत शिक्षण कसं असावे, याचे विविध दाखले आणि उदाहरणे दिली. यावेळी शिक्षकांतून उपस्थित झालेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. तसेच काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर शाळेत कशा पद्धतीने चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला जातो याची यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणे देऊन माहितीही यावेळी दिली. दरम्यान, या प्रशिक्षणात सागर पोकळे, प्रभात कोकजे, मानसी गानू, सुधीर शिंदे, दिगंबर घवाळी, मोहन बापट, विभा बाणे, वर्षा घाग आदी मार्गदर्शन करत आहेत तर हे प्रशिक्षण डाएटचे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर, राहुल बर्वे, राजेंद्र लठ्ठे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.