रोपांच्या प्लास्टिक पिशव्या प्रतिष्ठानकडे द्याः डॉ. परांजपे

रोपांच्या प्लास्टिक पिशव्या प्रतिष्ठानकडे द्याः डॉ. परांजपे

Published on

रोपांच्या प्लास्टिक पिशव्या
प्रतिष्ठानकडे द्या ः डॉ. परांजपे
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २१ ः मुख्यमंत्र्यांनी राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली होती. या कार्यक्रमानंतर प्लास्टिकचे प्रदूषण होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन प्लास्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी रोपांच्या प्लास्टिक पिशव्या निवेदिता प्रतिष्ठानकडे पाठवाव्यात, अशी मागणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित आच्छादन वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी अशी दहा कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली आहे. रोपांच्या पिशव्या तिथेच कुठेतरी बांधावर किंवा कोपऱ्यात टाकून ठेवल्या जातात. त्यामुळे जमिनीचे आणि पाण्याचे प्रदूषण होते. होणारा प्लास्टिक कचरा टाळण्यासाठी ठोस असे धोरण आखणे आवश्यक आहे. वृक्ष लागवडीनंतर दहा कोटी पिशव्यांचे संकलन करून आणि त्या एकत्रितरित्या निवेदिता प्रतिष्ठानकडे संस्थेच्या दापोली-जालगाव येथील कचरा संकलन केंद्रात पाठवाव्यात, अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष डॉ. परांजपे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com