
जिल्ह्यातील ९२ शिधापत्रिका रद्द
पुरवठा विभाग : ४ लाख ४५ हजार कार्डधारक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : राज्यभरात शिधापत्रिकेसाठी (रेशनकार्ड) ई-केवायसी मोहीम राबवली जात आहे. त्यात गरिबांच्या धान्यावर बेकायदेशीरपणे डल्ला मारणाऱ्या अनेक उच्चभ्रूंना धक्का बसला आहे. शिधापत्रिका तपासणी मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील ९२ जणांची शिधापत्रिका जिल्हा पुरवठा विभागाने रद्द केली आहेत. ही मोहीम अशी पुढे सुरू राहणार असल्याचे महिती पुरवठा विभागाने सांगितले.
सरकारी अन्नधान्य योजनेला लागलेली सुखवस्तूची वाळवी अधिक काळ सर्वसामान्यांना पोखरू नये यासाठी शासनाने आधारकार्डच्या मदतीने ई-केवायसी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत अनेक बोगस शिधापत्रिकाधारकांचा पर्दाफाश झाला आहे. त्याच्या नावांची नोंदणी रद्द केली आहे. आता मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात आणखी मोठ्या प्रमाणात कार्ड रद्द होणार आहेत. रत्नागिरीत जिल्हा पुरवठा विभागाने मे २०२५ अखेर केलेल्या तपासणीत ४ लाख ४५ हजार ३१९ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यात नव्याने वितरित केलेल्या ५५६ कार्डांचा समावेश झाला आहे तर ९२ कार्ड रद्द केले असून, त्यात शुभ्र २३, केशरी (एनपीएच) २९, केशरी (पीएचएच) १२ कार्डांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत १८ लाख रेशनकार्ड रद्द करण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.