
‘डिफेन्स सिटी’साठी नौदल तळ उभारा
मिलिंद कीर ः वाटद प्रकल्पाबाबत संरक्षण मंत्रालयाला पत्र
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : तालुक्यातील वाटद औद्योगिक क्षेत्रात सुमारे १० हजार कोटींच्या गुंतवणुकीसह धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी प्रकल्प प्रस्तावित आहे. रिलायन्स ग्रुप आणि जर्मन कंपनी यांच्यातील भागीदारीतून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पात दरवर्षी २ लाख आर्टिलरी शेल्स, १० हजार टन स्फोटके, २ हजार टन प्रोपेलंट्स तोफांचे दारूगोळे, लष्करी सामग्री व यंत्रणा तयार केली जाणार आहे; मात्र याच्या संरक्षणाच्यादृष्टीने रत्नागिरीत नौदलाचा तळ नाही, असे पत्र माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी संरक्षण मंत्रालयाला दिले आहे.
रत्नागिरी कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाचे शहर आहे. ही जागा भौगोलिकदृष्ट्या खुल्या आक्रमणाच्यादृष्टीने संवेदनशील आहे. येथे सध्या एक कोस्टगार्ड स्टेशन आहे; मात्र ते फक्त शोध, बचाव व निरीक्षण कार्यापुरते मर्यादित आहे. युद्धजन्य परिस्थितीत तत्काळ कारवाई करणारा नौदल तळ अजून अस्तित्वात नाही. २०२० मध्ये लेबनॉन बैरूत बंदरावर २ हजार ७५० टन अमोनिया नायट्रेट साठवले गेले होते. त्याचा स्फोट होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले, हजारो जखमी झाले आणि पूर्ण शहर हादरले. यावरून स्पष्ट होते की, स्फोटक व्यवसायातून संभाव्य विनाश किती भयावह असू शकतो. स्थानिक सत्ताधाऱ्यांनी अशा दुर्घटनांपासून शिकणे गरजेचे आहे. जर प्रकल्प रत्नागिरीतच राहणार असेल तर नौदल तळ तातडीने उभारावा. हा प्रकल्प आर्थिक नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे म्हणून शासनाने फार काळजीपूर्वक निर्णय घ्यावे, अशी मागणीही कीर यांनी पत्रातून केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.