भविष्यवेधी शिक्षण यशाची गुरुकिल्ली
swt320.jpg
75022
देवगड ः सतीश सावंत आणि सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
भविष्यवेधी शिक्षण यशाची गुरुकिल्ली
सतीश सावंतः देवगडमध्ये युवासेनेतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. योग्य शिक्षण असल्यास भविष्यात नोकरीसाठी राजकीय पक्षांच्या वशिलेबाजीची गरज भासणार नाही. बदलत्या तंत्रज्ञानामुळे नोकरी लावणे राजकीय पक्षांच्या हातात नाही. त्यामुळे दहावीच्या गुणांवर पुढील शिक्षणाची दिशा न ठरवता आपल्याला काय बनायचे, हे ठरवून ध्येय निश्चिती करा, असे आवाहन जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे केले. विद्यार्थी दशेतच योग्य मार्गदर्शन झाल्यास भविष्यातील उत्तम नागरिक बनतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून तालुक्यातील माध्यमिक शाळांमधून पहिल्या तीन आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी श्री. सावंत बोलत होते.
मंचावर श्री. सावंत यांच्यासह ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकूर, तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, जयेश नर, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, उपजिल्हाप्रमुख यदुनाथ ठाकूर देसाई, संदीप कदम, निनाद देशपांडे, संजय देवरुखकर, विष्णू घाडी आदी उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, विद्यार्थीदशेत योग्य मार्गदर्शन झाल्यास उत्तम नागरिक बनतील. यासाठी ध्येय निश्चित हवे. दहावीच्या गुणांवर पुढील शिक्षणाची दिशा न ठरवता तसेच कोण कुठल्या शाखेत जातो, यापेक्षा मला काय बनायचे, हे ठरवले पाहिजे. यासाठी गुणांवर प्रवेश ठरवू नका. कुठलीही शाखा कमी नाही. स्पर्धा परीक्षांसाठी वाचन महत्त्वाचे आहे. संगणकीय ज्ञान, टायपिंग आवश्यक ठरते. परदेशी भाषा शिकल्या पाहिजेत. नोकरी लावणे राजकीय पक्षांच्या हातात नाही. बदलत्या तंत्रज्ञानामध्ये रोजगार कमी होतील. प्रवेश पात्रता परीक्षांची माहिती ठेवावी. योग्य शिक्षण असल्यास नोकरीसाठी राजकीय पक्षांच्या वशिलेबाजीची गरज नाही. विद्या वेतन मिळवून शिकता आले पाहिजे." संदीप कदम यांनी, विद्यार्थ्यांनी उदिष्ट ठेवून अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे, असे आवाहन केले. यावेळी नीलम पालव, गणेश गावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला संस्कृती तोरसकर हिने शिवगर्जना सादर केली. सूत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनी केले.
चौकट
गुणवंत विद्यार्थी जिल्ह्याचे भविष्य
समाजकारण ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे जिल्ह्याचे भविष्य आहे. जिल्हा विकासामध्ये ते मोलाचा वाटा उचलतील. यासाठी विद्यार्थी गुणगौरव महत्त्वाचा आहे. तरुणांमध्ये उत्साह वाढण्यासाठी यापूर्वी भजन स्पर्धा घेतली होती. तरुण कुठल्याही विळख्यात सापडू नये, यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने लक्ष केंद्रित करून यशाचा पाठलाग करावा, असे आवाहन ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यावेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.